भारत, डिसेंबर 8 -- बांगलादेशने भारताविरूद्ध ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना बुधवारी खेळला गेला. यामध्ये भारताला ५ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या दोन्ही एकदिवसीय सामन्यातील पराभवामागे एक नाही तर ५ प्रमुख कारणे आहेत. पहिल्या वनडेत भारताचा एका धावेने पराभव झाला होता.

पंत आणि शमी वेळेवर संघाबाहेर झाले

भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आला तेव्हा पूर्ण तयारीनिशी आला नव्हता. कारण पहिला सामना सुरु होण्याच्या काही वेळापूर्वीच ऋषभ पंत एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला. वैद्यकीय टीमच्या सल्ल्याने तो संघाबाहेर झाल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे पंतच्या जागी बदली खेळाडूही घेण्यात आला नाही.

या सोबतच अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलाही दुखापत झाल्याने तो मालिकेतून बाहेर पडला. त्याच्या जागी उमरान मल...