Mumbai, नोव्हेंबर 29 -- kannada vedike organization hoisted flag in maharashtra : अक्कलकोट, जत आणि सोलापूर शहरावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा ठोकल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटकातील सीमावादाचा प्रश्न आणखी पेटला आहे. कर्नाटकच्या सीमेलगत असलेल्या तिकोंडी आणि उमराणीतील ग्रामस्थांनी सभा घेत आमच्या समस्या सोडवा नाही तर आम्ही कर्नाटकमध्ये सामील होऊ, असा इशारा महाराष्ट्र सरकारला दिल्यानंतर आता कर्नाटकातील कन्नड वेदिके संघटनेनं तिकोंडी आणि उमराणी गावात कर्नाटकचा कानडी ध्वज फडकावला आहे. त्यामुळं आता या प्रकरणावरून महाराष्ट्रात राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील कन्नड वेदिके संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील तिकोंडी आणि उमराणीतील गावकऱ्यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र सरकारवर नाराज असलेल्य...