भारत, एप्रिल 14 -- नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा व्याजदरात कपात केली आहे. याचा परिणाम आता बँकांच्या एफडी योजनेवर होऊ लागला आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने अमृत कलश एफडी योजना बंद केली आहे. त्याचबरोबर नॉर्मल एफडी स्कीम्समध्ये ठराविक कालावधीसाठी व्याजदरात कपात करण्यात आली आहे.

बँकेने अमृत वृष्टी योजना पुन्हा सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना 444 दिवसांच्या एफडीवर 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळणार आहे. एसबीआयने काही काळासाठी सामान्य एफडीवरील व्याजदरात १० बेसिस पॉईंट्सची कपात केली आहे.

एसबीआयने केलेल्या बदलानंतर सर्वसामान्य नागरिकांसाठी चा व्याजदर आता ३.५० टक्क्यांवरून ६.९० टक्के करण्यात आला आहे. तर, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 4 टक्क्यांवरून 7.50 टक्के करण...