Mumbai, एप्रिल 27 -- Weather News: मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar), रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg) या जिल्ह्यांत पुढील काही दिवस उष्णता वाढणार असून नागरिकांना पुन्हा एकदा उन्हाच्या झळा सोसाव्या लागण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह पावसाचा शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शुक्रवारी अनेक ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोहोचले. जळगावमध्ये सर्वाधिक तापमानाची (४२.७ अंश सेल्सिअस) नोंद झाली. या व्यतिरिक्त चंद्रपूर (४२.६ अंश सेल्सिअस), वाशीम (४२.६ अंश सेल्सिअस), जेऊर ४२.५ (अंश सेल्सिअस), धुळे (४२.० अंश सेल्सिअस), मालेगाव (४२ अंश सेल्सिअस), अकोला (अंश ४२ सेल्सिअस) आणि वर्ध्यात ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नो...