मुंबई, डिसेंबर 8 -- मुंबई : शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ असलेले खासदार संजय राऊत हे तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी पुन्हा विरोधकांवर हल्ला चढवला आहे. सरकारवर त्यांनी हल्लाबोल केला आहे. दरम्यान, संजय राऊत यांना बुधवारी दोन वेळा निनावी फोन आले असून त्यांना फोन करणाऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.

राज्यात सध्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून राजकारण पेटले आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर यावरुन टीका केली होती. सरकार नामर्द असल्याची टीका राऊत यांनी केली होती. दरम्यान, शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर पलटवार करत जोरदार हल्ला चढवला होता. राऊतांनी आपल्या जिभेवर ताबा ठेवावा असे शंभुराजे देसाई यांनी म्हटले होते. दरम्यान ही पत्रकार परिषद झाल्य...