Mumbai, फेब्रुवारी 9 -- लाल कृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार घोषित केल्यानंतर मोदी सरकारकडून आज माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह,पी. व्ही. नरसिंह राव तसेच शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांना सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून याबाबतची घोषणा करण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

सरकारने इतरांना दाखवेलं औदार्य हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंबाबत दाखवून त्यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट करत केली आहे.

राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हर...