Kolkata, जानेवारी 31 -- Congress Bharat Jodo Nyay Yatra : देशातील सध्याच्या राजवटीवर तोफा डागत मणिपूर ते मुंबई न्याय यात्रा सुरू करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या यात्रेत पदोपदी अडथळे येत आहेत. बिहार-पश्चिम बंगालच्या सीमेवर राहुल यांच्या कारवर दगडफेक झाल्याचं वृत्त आहे. यात त्यांच्या कारची काच फुटली आहे. काँग्रेसनं या घटनेवर तात्काळ खुलासा केला आहे.

काँग्रेस नेते खासदार अधीररंजन चौधरी (Adhir Ranjan Chaudhary) यांनी हा दगडफेकीचा आरोप केला आहे. मणिपूरमधून सुरू झालेली राहुल गांधी यांची यात्रा मंगळवारी पश्चिम बंगालमार्गे बिहारमध्ये आली. बिहारमध्ये त्यांनी एक रोड शो केला. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये परतत असताना मालदा जिल्ह्यातील हरिश्चंद्रपूर भागात त्यांच्या कारवर हल्ला झाला.

'अज्ञात व्यक्तींनी गांधी यांच्या कारवर दगडफेक...