Mumbai, मे 3 -- Parbhani Crime: परभणीच्या जिंतूरमध्ये धक्कादायक घटना घडली. हॉटेलमध्ये नाश्ता देणाच्या वादावरून एका ग्राहकाची हत्या करण्यात करण्यात आली. याप्रकरणी हॉटेल मालकासह इतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजगर शेख ख्वाजा असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ख्वाजा हे महाराष्ट्र सुरक्षा बल मुंबईत नोकरी करत असून सु्ट्टीनिमित्त जिंतूर तालुक्यातील केळा या गावी गेले होते. मुंबईकडे येताना ख्वाजा हे जिंतूर येथील सपना हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेले. त्यावेळी ख्वाजा आणि हॉटेल मालक शेषराव आव्हाड, त्यांचा मुलगा अमोल, बलाजी रणखांबे आणि इम्रान कुरेशी यांच्यात वाद झाला. यानंतर या चौघांनी ख्वाजाला ब...