भारत, एप्रिल 16 -- राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून राज्यातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट आली आहे. उन्हाचा तडाखा आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून उष्माघाताच्या घटनाही वाढताना दिसत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना त्रास होत असून आता पालघरमध्ये उष्माघाताने (Heat Stroke) १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अश्विनी विनोद रावते असं उष्माघाताने मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

ही घटना पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमधील केव वेडगे पाडा येथे घडली आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास अश्विनीचा उष्माघाताने मृत्यू झाला. अश्विनीचा मृतदेह शेतात आढळून आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अश्विनी ही मनोर मधील एस.पी. मराठी विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकत होती.

Kailas Patil : ओमराजे निंबाळकरांचा प्रचार सुरू असताना...