Mumbai, मे 7 -- Raj Thackeray On operation sindoor : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी म्हटले की, युद्ध हे काही दहशतवादावरील उपाय नाही. त्याऐवजी सरकारने दहशतवाद्यांना शोधून काढून त्यांचे नेटवर्क संपवले पाहिजे. दहशतवादी हल्ल्यामागील दोषींना पकडण्याला प्राधान्य द्यायला हवे.

राज ठाकरे म्हणाले, दहशतवादी हल्ल्याचे उत्तर युद्ध होऊ शकत नाही. त्याउलट ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे त्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. मात्र पहलगाम हल्ला करणारे दहशतवादी अजून आपल्याला सापडले नाहीत. त्यामुळे देशात मॉक ड्रिल नाही तर कोम्बिंग ऑपरेशन करण्याची गरज आहे.

राज ठाकरेंनी सुरक्षा यंत्रणांच्या त्रुटींवर बोट ठेवत म्हटले की, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजून सापडलेले नाहीत. दरवर्षी हजारो पर्यटक जिथे जातात, तिकडे सुरक्षा क...