Mumbai, मे 7 -- Operation Sindoor : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे देशभरातील विमान सेवेवर परिणाम झाला आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव २०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, तर उत्तर आणि पश्चिम भारतातील किमान १८ विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहेत.

या विमानतळांमध्ये श्रीनगर, लेह, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, जोधपूर, जैसलमेर, सिमला, धर्मशाला आणि जामनगर या विमानतळांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकट्या इंडिगो एअरलाइन्सने जवळपास १६० उड्डाणे रद्द केली आहेत. जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट येथून येणारी सर्व उड्डाणे १० मे रोजी पहाटे ५ वाजून २९ मिनिटांपर्यंत रद्द करण्यात आली आहेत.

बुधव...