Mumbai, मे 12 -- Maharashtra Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रसह संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. देशात आतापर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. यानंतर उद्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर गृह खात्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. गृह खात्याने मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने याबाबत माहिती दिली.

Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचे होते, देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा

महाराष्ट्रात आतापर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी (१३ मे २०२४) रोजी मतदान होणार आहे. यानंतर पाचव्या टप्प्यासाठी मतदान होईल. यामध्ये मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंब...