भारत, मे 13 -- देशभरातील बळीराजाला अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मान्सूनच्या अंदाजावर शेतकरी शेतीची तयारी करत असतात. दरम्यान, या वर्षी चांगले पर्जन्यमान असल्याचे काही तज्ज्ञांनी सांगितले होते. दरम्यान, हवामान खात्याने मान्सूनबाबतची नवीनतम अपडेट दिली आहे. नैऋत्य मान्सून मंगळवारी म्हणजेच आज दक्षिण बंगालच्या उपसागरात, दक्षिण अंदमान समुद्रात, निकोबार बेटे आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात पोहोचला आहे.

नैर्ऋत्य मोसमी वारे अंदमान समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागर आणि अंदमान-निकोबार बेटांच्या काही भागांत निर्धारित वेळेच्या किमान एक आठवडा आधीच दाखल झाले आहेत, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) मंगळवारी दिली.

२०२० मध्ये प्रसिद्ध झालेल्या आयएमडीच्या भारतातील नैर्ऋत्य मॉन्सूनच्या सुरुवात/प्रगती आणि माघारीच्या नवीन सामान्य ता...