Mumbai, फेब्रुवारी 2 -- महाराष्ट्र केसरी २०२५ या स्पर्धेत मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे. डबल महाराष्ट्र केसरी कुस्तीपटू शिवराज राक्षे याने पंचांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. अहिल्यानगर येथे राज्य कुस्तीगीर संघ आणि जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर शिवराज राक्षे याने पंचांना मारहाण केली.

महाराष्ट्र केसरी २०२५ या स्पर्धेची गादी विभागातील फायनल नांदेडचा शिवराज राक्षे आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली. हा सामना पृथ्वीराज मोहोळ याने जिंकला. पण शिवराज राक्षे याला हा पराभव मान्य नव्हता.

अशा स्थितीत राक्षे याने पंचांच्या निर्णयाला विरोध केला. यानंतर संतापाच्या भरात त्याने पंचांची कॉलर पडकली आणि लाथ मारली, हा संपूर्ण घटनाक्रम उपस्थितांनी पाहिला. तसेच, कॅमेऱ्...