भारत, मे 3 -- 2 burnt alive In Gadchiroli: गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा गावात खळबळजनक घटना घडली. काळ्या जादूच्या संशयातून दोन जणांना जिवंत पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत गंभीररित्या भाजलेल्या दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी गावातील १५ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

मिळालेल्या माहितीनुसार, देउ अटलामी आणि जमनी तेलमी असे होरपळून मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. हे दोघेही तालुक्यातील बसेरवाडा गावात वास्तव्यास होते. दरम्यान, बुधवारी रात्री आरोपी गावकऱ्यांनी अटलामी आणि तेलमी यांना त्यांच्या घरातून ओढून नेले आणि त्यांना तीस मारहाण केली. यानंतर गावकऱ्यांनी त्यांना जिवंत पेटवून दिले. यानं...