Mumbai, नोव्हेंबर 30 -- Bhagat Singh Koshyari On Shivaji Maharaj : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळं कोश्यारींना पदमुक्त करण्यासाठी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना करून राज्यपालपदावरून हटवण्यात यावं, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी कोर्टाकडे केली आहे. त्यानंतर आता कोर्टानं याचिकेवर उद्या सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे. त्यामुळं आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक जगदेव यांनी अॅड नितीन सातपुते यांच्यामार्फत कोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर हायकोर्टातील मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्यासमोर ...