Mumbai, डिसेंबर 6 -- Maharashtra-Karnataka Border Dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील सोलापूर, जत आणि अक्कलकोट शहरांवर दावा ठोकला आहे. याशिवाय सोलापुरात कर्नाटक भवन उभारण्यासाठी दहा कोटी रुपये मंजुर केले आहेत. त्यामुळं आता राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणी वाढलेल्या आहेत. कर्नाटक सरकारनं सीमाप्रश्नावरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतरही राज्यातील सत्ताधाऱ्यांनी भूमिका स्पष्ट न केल्यानं कॉंग्रेससह राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. त्यातच आता कर्नाटक सरकारनं सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळं आता सीमावाद आणखी टोकाला पोहचण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराजे देसाई यांनी मराठी भाषिक...