Baramati, नोव्हेंबर 29 -- पुणे : बारामती तालुक्यातील मालेगाव येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीने प्रेमविवाह केल्याने संतापलेल्या आईने आणि मुलाने मुलीच्या दिरावर प्राणघातक हल्ला केला. येथील कॉलनी लक्ष्मी नगर येथे ही घटना घडली. दोन्ही घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. यामुळे मुलगा आणि मुलगी हे पळून गेले होते. हे कळताच मुलीची आणि आणि भावाने थेट मुलाचे घर गाठत दिरावर हल्ला केला.

सुनिता संजय चव्हाण आणि मयूर संजय चव्हाण असे आरोपी आई आणि मुलाचे नाव आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मुलगा आणि मुलगी हे पोलिस ठाण्यात हजर झाले असून पोलिसांनी त्यांना संरक्षण दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळेगाव येथील लक्ष्मी नगर येथे राहणाऱ्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांनी पळून जाऊन लग्न...