भारत, मे 29 -- arvind kejriwal on alliance with congress : 'आम आदमी पक्षानं भारतीय जनता पक्षाच्या पराभवासाठी, भाजपची गुंडगिरी व हुकूमशाही संपवण्यासाठी काँग्रेसशी युती केली आहे. ही युती कायमची नाही. आम्ही लग्न केलेलं नाही,' असं विधान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच त्यांनी हे वक्तव्य केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

'इंडिया टुडे'ला दिलेल्या एका मुलाखतीत केजरीवाल यांनी काँग्रेससोबतच्या आघाडीवर भाष्य केलं. 'येत्या ४ तारखेला देशाला मोठं सरप्राईज मिळेल. लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांची आघाडी इंडिया जिंकेल, असा दावा त्यांनी यावेळी केला.

'देश वाचवणं गरजेचं आहे. जिथं जिथं भाजपला पराभूत करण्यासाठी युतीची गरज होती, तिथं 'आप'नं काँग्रेससोबत युती करून एकच उमेदवार उभा केला. पंजाबमध्ये भाजपचं अस्तित्व...