भारत, मे 8 -- भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे चवताळलेल्या आणि हताश झालेल्या पाकिस्तानने बुधवारी रात्री जम्मू-काश्मीरपासून गुजरातपर्यंत किमान १५ शहरांमधील लष्करी तळांना क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे हल्ले पूर्णपणे हाणून पाडले. इतकंच नाही तर प्रत्युत्तरादाखल लाहोरची हवाई संरक्षण यंत्रणाही फेल केली आहे.

विशेष म्हणजे २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू करत दहशतवादाविरोधात मोठं युद्ध छेडलं आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. या दरम्यान 100 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. त्याचबरोबर ही कारवाई अजूनही सुरू च आहे.

भारताच्या या कारवाईनंतरही दहशतवादाला आश्रय देणारा पाकिस्तान ...