Navi mumbai, मे 3 -- कवी मन असल्याशिवाय साहित्यिक लेखन होऊ शकत नाही. साहित्यनिर्मितीसाठी मनात कोमलता आणि निर्मलता लागते. ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभवच नाही, ते अनुभव पुस्तकातून मांडणे हे कृत्रिम असते. असं मत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले. पत्रकार विकास महाडिक लिखित 'एका आज्जीची गोष्ट' या पुस्तकाचे प्रकाशन गणेश नाईक यांच्या हस्ते झाले. नवी मुंबईतील वाशी स्थित साहित्य मंदिर सभागृहात पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ कवी, साहित्यिक अरुण म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष समर खडस, राजकीय विश्लेषक अभय देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर उपस्थित होते.

तर मी १९९५ सालीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्र...