भारत, एप्रिल 18 -- सध्या मालिका विश्वामध्ये नव्या मालिकांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ एक अशा अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. पण या नव्या मालिकांमुळे जुन्या मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे. आता कलर्स मराठी वाहिनीवर एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समोर आले आहे. याबाबत त्या मालिकेतील कलाकारांनी माहिती दिली आहे. मालिकेतील काही कलाकारांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली आहे.

कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच 'इंद्रायणी', 'सुख कळले', 'हसताय ना हसायलाच पाहिजे' आणि 'सुख कळले' या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामधील 'सुख कळले' ही मालिका २२ एप्रिल पासून रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेमुळे 'रमा राघव' मालिकेची वेळ बदलून रात्री ९.३० वाजता करण्यात आली ...