प्रयागराज, जानेवारी 29 -- Maha Kumbh Stampede : मौनी अमावास्येला स्नानासाठी जमलेल्या गर्दीत बुधवारी महाकुंभादरम्यान, बुधवारी रात्री १ ते २ च्या दरम्यान, झालेल्या चेंगराचेंगरीत १५ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर काही नागरिक जखमी झाल्याचे देखील वृत्त आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी या घटनेवर लक्ष ठेऊन आहेत. तसेच जखमींवर उपचार सुरू आहे. दरम्यान, ही घटना नेमकी कशी झाली या बाबत प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली.

मौनी अमावास्येला स्नानासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या वेळी प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मौनी अमावस्येला होणाऱ्यामनाच्या अमृतस्नानासाठी आम्ही येथे आलो होतो. हा महाकुंभाचा प्रमुख विधी असून येथे अंदाजे १० कोटी भाविक उपस्थित असतील. यावर्षी यंदा १४४ वर्षांनंतर होत असलेल्या दुर्मिळ 'त्रिवेणी योगा'मुळे...