Mumbai, फेब्रुवारी 3 -- Maharashtra Tiger and leopard death : राज्यात वन्य प्राणी आणि मानवी संघर्ष वाढला आहे. या संघर्षात राज्यात ११ वाघ आणि १८ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. काही जणांची शिकार करण्यात आली तर काही वन्य प्राणी हे रस्ते अपघात, विजेचा धक्का तर काहींचा भक्ष्य सोधतांना विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. वन्य प्राण्यांच्या मृत्यूचा हा वाढता आकडा चिंताजनक आहे. काही घटनांचा शवविच्छेदन अहवाल मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

राज्यातील १४ जिल्ह्यामध्येही या घटना घडल्या आहेत. रेल्वेची धडक झाल्यामुळे राज्यात १ वाघाचा तर २ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. तर ३ वाघांचा मृत्यू हा वाहनांच्या धडकेमुळे झाला आहे तर ४ बिबट्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर पाच बिबटे हे विहिरीत व कालव्यात पडून मृत्यू झाला आहे....