Mumbai, जून 9 -- महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत मोठा रेल्वे अपघात झाला आहे. लोकलमधून पडून ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. लोकलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते, अशी माहिती समोर आली आहे.

मुंब्रा ते दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान ही घटना घडली. अपघाताच्या वेळी पुष्पक एक्स्प्रेस आणि कसारा लोकल ओलांडत होत्या. गर्दीमुळे लोक डब्यातून खाली पडल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत असल्याचेही बोलले जात आहे. रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या दुर्घटनेनंतर मुंबई उपनगरासाठी बांधण्यात येत असलेल्या उर्वरित रेकमध्ये स्वयंचलित दरवाजे असतील, असा निर्णय रेल्वेने घेतला आहे. तसेच रुळांवर धावणाऱ्या रेकमध्ये बदल करून द...