Mumbai, फेब्रुवारी 7 -- Rahul Gandhi News: महाराष्ट्रातील विधानसभेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. '२०१९च्या निवडणुकीनंतर पाच वर्षांत महाराष्ट्रात ३२ लाख मतदार जोडले गेले. परंतु, लोकसभा २०२४ आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान ३९ लाख मतदारांची भर पडली. पाच महिन्यांत इतके मतदार कसे सामील झाले? ही संख्या हिमाचल प्रदेशच्या एकूण मतदारांच्या संख्ये इतकी आहे. हे मतदार कुठून आले?' असे प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केले. तसेच निवडणूक आयोगाने या प्रश्नांची उत्तरे मागूनही दिलेली नाहीत, असाही आरोप राहुल गांधी यांनी केला.

गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तफावत असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. पाच महिन्यांच्या अल्पावधीत ३९ लाखांहून अधिक मतदारांची म...