भारत, मे 2 -- पहलगामयेथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे सरकार आणि लष्कर भीतीच्या सावटाखाली जगत आहे. त्यांना भारताच्या प्रत्युत्तराची भीती वाटते. त्यामुळेच पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधील सर्व धार्मिक कार्यक्रम पुढील १० दिवसांसाठी बंद केले आहेत. इतकंच नाही तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेले १००० हून अधिक मदरसे ही तात्पुरते बंद केले आहेत. भारत या मदरशांना दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे म्हणून टार्गेट करू शकतो, अशी भीती खुद्द पाकिस्तानी अधिकारीच व्यक्त करतात.

त्याचबरोबर LOC पासून कित्येक किमी दूर असलेल्या पाकच्या खैबर पख्तूनख्वा भागात सरकारने २९ जिल्ह्यात सायरन प्रणाली लावण्याचे आदेश दिलेत. ज्यात पेशावर, एबटाबाद यांचाही समावेश आहे.

पाकिस्तानी अधिकारी हाफिज नजीर अहमद यांनी रॉयटर्सला सांगितले की, "हे मदरसे तात्पुरते बंद करणे हा आमचा...