Pakistan, मे 3 -- भारतात दहशतवाद पसरवणाऱ्या पाकिस्तानची स्वतःच्या अंतर्गत संघर्षामुळे वाईट अवस्था झाली आहे. नुकतेच जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा संबंध समोर आला होता. पण ते स्वत: अंतर्गत संघर्षाने त्रस्त आहेत. सिंधमध्ये पाणी वाटपासाठी हाहाकार माजला असून स्थानिकांनी महामार्ग रोखून धरले आहेत. दरम्यान, बलुचिस्तानमधील कलात येथे एक हल्ला झाला आहे. क्वेटा-कराची महामार्ग मोठ्या संख्येने बंदुकधारींनी रोखून धरला. एवढेच नव्हे तर घटनास्थळावरून जाणाऱ्या वाहनांचेही नुकसान झाले.

कलात जिल्ह्यातील मंगोचर भागात ही घटना घडली. येथे या लोकांनी अनेक सरकारी इमारतींना आग लावली. या इमारतींमध्ये नॅशनल बँक ऑफ पाकिस्तानचे कार्यालय, स्थानिक न्यायालय आणि अनेक विभागांच्या कार्यालयांचा समावेश आहे. या आगीत इमारतींचे मोठ्या प्रमाणात...