New delhi, मे 8 -- India Pakistan Tension: पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. काल रात्री पाकिस्तानने पठाणकोटसह १५ लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, जो भारतीय लष्कराने हाणून पाडला. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणा एस-४०० ने आकाशातील पाकिस्तानी क्षेपणास्त्रांना निष्प्रभ केले. यानंतर भारताने प्रत्युत्तर देत पाकिस्तानातील लाहोरमध्ये ड्रोनद्वारे हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या हवाई संरक्षणाच्या एचक्यू-९ एअर डिफेन्स क्षेपणास्त्र प्रक्षेपकांचे मोठे नुकसान झाले आहे.

७-८ मे च्या मध्यरात्री पाकिस्तानने अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा,...