Delhi, मे 17 -- Supriya Sule: दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी भारत सरकार खासदारांचे शिष्टमंडळ परदेशात पाठवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात जाऊन ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची बाजू मांडण्यासाठी खासदारांच्या आठ समित्या स्थापन केल्या आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. मलाही एका समितीत सामील होण्यास सांगण्यात आले आहे. देशाच्या प्रश्नावर आपण सर्व जण एकत्र आहोत, हे स्पष्ट आहे, असे त्या म्हणाल्या.

काल मला केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा फोन आला. त्यांनी मला यापैकी एका समितीचा भाग होण्यास सांगितले आहे. जेव्हा आपल्या देशाचा प्रश्न येतो तेव्हा आपण सर्व जण एकत्र येतो, राजकीय भेद बाजूला सारतो आणि आपल्या देशाचा दृष्टिकोन मांडण्यासाठी इतर देशांमध्ये ...