Mumbai, फेब्रुवारी 8 -- Anna Hazare On Delhi Election: दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये असे मानले जात आहे की, भाजप 26 वर्षांनंतर दिल्लीत पुन्हा सत्तेत येऊ शकते. दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. उमेदवाराचे आचरण, विचार शुद्ध असावेत, जीवन निष्कलंक असावे, त्याग असावा, असे मी नेहमीच म्हटले आहे. या गुणांमुळे मतदारांचा त्यांच्यावर विश्वास बसतो. दिल्ली निवडणुकीच्या निकालाबाबत बोलायचे झाले तर दुपार होण्याआधीच चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. ७० जागांपैकी भाजपला ४६ तर आम आदमी पक्षाला २४ जागा मिळाल्या आहेत.

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्ली निवडणुकीच्या निकालादरम्यान सांगितले की, 'लोकांनी नव्या पक्षावर विश्वास ठेवला होता, परंतु नंतर दारूची दुकाने वाढल्याने अरविंद क...