भारत, जून 4 -- जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रत्युत्तर दिले आहे. याची पाकिस्तानने कल्पनाही केली नव्हती. या प्रतिहल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे किती नुकसान झाले याची माहिती हळूहळू समोर येत आहे. भारतीय हल्ल्यात पाकिस्तानची ६ लढाऊ विमाने उद्ध्वस्त झाल्याची पहिली बातमी समोर आली. तर हा आकडा आता ९ वर पोहोचला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूरनंतर करण्यात आलेल्या मूल्यांकनात पाकिस्तानच्या हवाई आणि जमिनीवरील लष्करी पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी हवाई दलाची सहा लढाऊ विमाने पाडण्यात आली आहेत. याशिवाय दोन हाय व्हॅल्यू सर्व्हेलन्स एअरक्राफ्ट आणि सी-१३० हर्क्युलिस ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टही पाडण्यात आले. त्याचबरोबर...