Delhi, मे 28 -- भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २९ मे रोजी पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या चार राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरी संरक्षण मॉक ड्रिल करण्याचे निर्देश दिले आहेत. गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मू-काश्मीर ही सीमावर्ती राज्ये आहेत. 'ऑपरेशन सिंदूर'च्या काही आठवड्यांनंतर ही मॉक ड्रिल होत आहे.

६-७ मे च्या रात्री भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांवर प्रत्युत्तर दिले. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटक ठार झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. प्रत्युत्तरादाखल भारतीय जवानांनी जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित १०० हून अधिक दह...