भारत, एप्रिल 25 -- 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत कार्तिक या खलनायकाची एण्ट्री झाल्यापासून वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. प्रत्येक वेळी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्तिकने मुक्तावर अतिप्रसंग केला. मुक्ता सर्वांना ओरडून ओरडून सत्य सागंण्याचा प्रयत्न करते. पण कोळी कुटुंबीय तिच्यावर जराही विश्वास ठेवत नाहीत. उलट कार्तिकच्या बाजूनेच उभे राहतात. आता सागर सर्वांसमोर कार्तिकचा खरा चेहरा आणणार आहे.

सावनी सईची कस्टडी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असते. त्यासाठी ती एक डाव देखील आखते. पण हा सगळा डाव तिच्यावर उलटतो. सईची कस्टडी मिळताच सावनी साखरपुडा करणार असते. पण कस्टडी न मिळाल्यामुळे हर्षवर्धन साखरपुड्यास नकार देतो. सई घरी आली नाही म्हणून आदित्य सागरला फोन करतो आणि काही प्रश्न विचारतो. तुमची दुसरी बायको आपल्या घरात कोणालाच आवडत ...