New delhi, मे 12 -- India Pakistan ceasefire: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीसंदर्भात लष्कराकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. हवाई दलाने सांगितले की, ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आम्ही केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य केले. पाकिस्तानने केलेल्या कारवाईमुळे आम्हाला प्रत्युत्तर देणे भाग पडले. पाकिस्तानकडून चिनी क्षेपणास्त्रांनी आमच्यावर हल्ला केला, पण ते आमच्या हवाई संरक्षण यंत्रणेत घुसण्यात अपयशी ठरले. आमच्या संरक्षण यंत्रणेने हवेतच ही क्षेपणास्त्रे नष्ट केली.

हवाई दलाच्या वतीने माध्यमांशी बोलताना एअर मार्शल भारती म्हणाले की, आम्ही केवळ दहशतवाद्यांवर, त्यांच्या तळांवर अचूक हल्ले केले, पण पाकिस्तानी सैन्याने ते स्वत:वर घेतले. पाकिस्तानी सैन्याशी युद्ध करणे किंवा त्यांच्या तळांना लक्ष्य करणे हा आमचा उद्देश नव्हता. हे यापूर्वीही आ...