New delhi, मे 13 -- भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीनंतर भारताने शेजारी देश पाकिस्तानला स्पष्टपणे सांगितले आहे की, आधी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) रिकामे करावे लागेल, त्यानंतरच द्विपक्षीय चर्चा सुरू होईल आणि सर्व प्रश्न सुटतील, असं भारतानं ठकावलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, काश्मीर प्रश्न भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय पद्धतीने सोडवला जावा, अशी आमची दीर्घकाळापासूनची भूमिका आहे; ही स्थिती बदललेली नाही. काश्मीर प्रश्नावर तिसरा पक्ष आम्हाला मान्य नाही, असे त्यांनी स्पष्ट स्वरात सांगितले.

जयस्वाल म्हणाले की, काश्मीरबाबत इस्लामाबादसमोर एकच मुद्दा आहे तो म्हणजे पाकिस्तानने बेकायदेशीररित्या ताब्यात घेतलेला भूभाग भारतात परत आणणे. पाक एअरबेस उद्ध्वस्त झाल्यानंतरच आपल...