Mumbai, मे 8 -- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित व्यावसायिक मराठी आणि बहुभाषिक चित्रपट बनवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले घाट, विहिरी आणि पाणी वितरण व्यवस्थेचे सर्वेक्षण करून त्यांच्या संवर्धनासाठी विशेष योजना राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने १०० विद्यार्थी क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील महिला सक्षमीकरणासाठी अनेक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. राज्यभरातील महिलांसाठी आदिशक्ती मिशन राबविण्याचा आणि आदिशक्ती पुरस्कार देण्याचा निर्णय मं...