Mumbai, एप्रिल 27 -- BMC: मुंबई महानगरपालिका मिठी चौकी जंक्शन (Mithi chowky junction) ते महावीर नगर जंक्शनदरम्यानची (Mahavir Nagar Junction) पाईपलाईन बदलण्याचे काम हाती घेणार आहे. या कामाला २ मे २०२४ रोजी रात्री १० वाजल्यापासून सुरुवात होईल. हे काम २४ तासांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या कालावधीत कांदिवली (Kandivali) आणि बोरिवलीच्या (Borivali) काही भागात ३ मे रोजी पाणीपुरवठा (Water Supply) बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले.

महावीर नगरमध्ये १२०० मिमीची जुनी पाइपलाइन बदलून नवीन पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. पाईपलाईन बदलण्याचे काम २ मे रोजी रात्री १०.०० ते ३ मे रोजी रात्री १० वाजेपर्यंत पूर्ण केले जाईल. या कालावधीत पाइपलाइन रिकामी केली जाईल. यामुळे बोरिवली, कांदिवलीत ३ मे रोजी पाण...